मार्क टुली - इंडिया इन स्लो मोशन ★★★
मार्क टुली यांचा जन्म ब्रिटीश कालीन भारतात झाला. त्याकाळी त्यांना भारतीय समाजापासून कटाक्षाने दूर ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यामुळे ते काहीसे अर्धवट भारतीय आहेत. त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोण गोऱ्या ब्रिटिशांप्रमाणे पूर्वग्रहदूषित आहे. ज्याप्रमाणे गोऱ्यांना भारतीय समाजाच्या भावना समजत नाही, तसेच मार्क यांचेही झाले आहे. त्यांच्या लिखाणातून हे जाणवते. काही प्रमाणात त्यांची भारतातील लोकांच्या अध्यात्माविषयी, भ्रस्टाचाराविषयी मत योग्य असले तरी बऱ्याच गोष्टींची जाण आपण पूर्णपणे भारतीय असल्याशिवाय होत नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या पुस्तकातील काही टीका काही विचार एक भारतीय म्हणून आपल्याला पटत नाहीत. तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्या बालकामगारांच्या प्रश्नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेल...