Posts

Showing posts from November, 2025

वॅसीली मित्रोखीन, ख्रिस्तोफर अँड्रू - द मित्रोखीन अर्काइव २ ★★★★

Image
वॅसिली मित्रोखिन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केजीबीच्या पहिल्या मुख्य संचालनालयाच्या परदेशी हेरगिरी करणाऱ्या विभागामधून केली. जेव्हा मित्रोखिन यांनी निकिता ख्रुश्चेव्हच्या एका गुप्त भाषणावर टीका केली तेव्हा त्यांना ऑपरेशन्समधून अभिलेखागारात (डॉक्युमेंट अर्काइवज विभागात) स्थानांतरित करण्यात आले. १९६० च्या अखेरीस, केजीबीचे लुब्यांका हे मुख्यालय अपुरे पडू लागल्याने मॉस्कोबाहेर यासेनेव्हो येथे एक नवीन इमारत बांधली. या इमारतीला मुख्य संचालनालयाचा दर्जा देण्यात आला आणि तेथून सर्व परदेशी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात येऊ लागले. त्या वेळी अभिलेखागार विभागाचे प्रमुख असलेले मित्रोखिन यांना कागदपत्रांची यादी तयार करण्याचे आणि नवीन मुख्यालयात त्यांचे सुव्यवस्थित हस्तांतरण पाहण्याचे काम सोपवण्यात आले. भव्य अभिलेखागाराचे हस्तांतरण पूर्ण व्हायला १९७२ ते १९८४ अशी १२ वर्षे लागली. या गदारोळाचा फायदा घेऊन मित्रोखिन यांनी त्यातली काही कागदपत्रे आणि त्यांतील मजकूर चोरला. १९९० मध्ये सोविएत संघाचे विघटन झाले. त्याचा फायदा घेऊन तो लाटव्हियाला गेला आणि त्याने तेथील ब्रिटिश आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांशी ...

मार्क टुली - इंडिया इन स्लो मोशन ★★★

Image
मार्क टुली यांचा जन्म ब्रिटीश कालीन भारतात झाला. त्याकाळी त्यांना भारतीय समाजापासून कटाक्षाने दूर ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यामुळे ते काहीसे अर्धवट भारतीय आहेत. त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोण गोऱ्या ब्रिटिशांप्रमाणे पूर्वग्रहदूषित आहे. ज्याप्रमाणे गोऱ्यांना भारतीय समाजाच्या भावना समजत नाही, तसेच मार्क यांचेही झाले आहे. त्यांच्या लिखाणातून हे जाणवते. काही प्रमाणात त्यांची भारतातील लोकांच्या अध्यात्माविषयी, भ्रस्टाचाराविषयी मत योग्य असले तरी बऱ्याच गोष्टींची जाण आपण पूर्णपणे भारतीय असल्याशिवाय होत नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या पुस्तकातील काही टीका काही विचार एक भारतीय म्हणून आपल्याला पटत नाहीत. तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्‍या बालकामगारांच्या प्रश्‍नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेल...