ना रुजला विचार...ना बहरला सहकार..!
पश्चिम महाराष्ट्राने सहकाराच्या बळावर आर्थिक क्रांती घडवली. साखर कारखाने उभे राहिले, दूध संघ वाढले, सहकारी बँकांचे जाळे विस्तारले आणि गावोगावी रोजगार निर्माण झाला. मात्र, कोकण नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असूनही सहकाराच्या बाबतीत मागे राहिला. हा केवळ भौगोलिक प्रश्न नाही, तर मानसिकतेचा प्रश्न आहे.कोकणात आंबा आहे, काजू आहे, मासेमारी आहे, पर्यटन आहे, मेहनती लोक आहेत. मग सहकार का वाढला नाही? कारण इकडे एखादी व्यक्ती पुढे जात असेल, एखादी संस्था उभी राहत असेल तर त्याला हात देण्याऐवजी त्याचे पाय खेचण्याची स्पर्धा सुरू होते. गटबाजी, अहंकार आणि वैयक्तिक वैर यामध्ये सामूहिक हित हरवून जाते. शेतकरी आणि सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी जिथे प्रशासन कमी पडत होते तिथे सहकार एक संजीवनी ठरला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सहकार जोमाने वाढला. तिकडे सहकाराच्या रोपट्याचा वटवृक्ष बनवला. कोकणात मात्र सहकार म्हणावा तसा रुजला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कोकणवासीयांनी मानसिकता. ती बदलणे हे आजही आव्हान आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आपली राजकीय पकड मजबूत करून किंवा मजबूत करण्यासाठ...