Posts

ना रुजला विचार...ना बहरला सहकार..!

Image
पश्चिम महाराष्ट्राने सहकाराच्या बळावर आर्थिक क्रांती घडवली. साखर कारखाने उभे राहिले, दूध संघ वाढले, सहकारी बँकांचे जाळे विस्तारले आणि गावोगावी रोजगार निर्माण झाला. मात्र, कोकण  नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असूनही सहकाराच्या बाबतीत मागे राहिला. हा केवळ भौगोलिक प्रश्न नाही, तर मानसिकतेचा प्रश्न आहे.कोकणात आंबा आहे, काजू आहे, मासेमारी आहे, पर्यटन आहे, मेहनती लोक आहेत. मग सहकार का वाढला नाही? कारण इकडे एखादी व्यक्ती पुढे जात असेल, एखादी संस्था उभी राहत असेल तर त्याला हात देण्याऐवजी त्याचे पाय खेचण्याची स्पर्धा सुरू होते. गटबाजी, अहंकार आणि वैयक्तिक वैर यामध्ये सामूहिक हित हरवून जाते. शेतकरी आणि सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी जिथे प्रशासन कमी पडत होते तिथे सहकार एक संजीवनी ठरला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सहकार जोमाने वाढला. तिकडे सहकाराच्या रोपट्याचा वटवृक्ष बनवला. कोकणात मात्र सहकार म्हणावा तसा रुजला नाही.  याचे मुख्य कारण म्हणजे कोकणवासीयांनी मानसिकता. ती बदलणे हे आजही आव्हान आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आपली राजकीय पकड मजबूत करून किंवा मजबूत करण्यासाठ...

किंगशुक नाग - किंगफिजर ★★★★

Image
विठ्ठल माल्या हे अत्यंत हुशार बिजनेसमेन होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अत्यंत कंजूषपणे बिजनेस चालवला आणि शून्यातून यूनायटेड ब्रेवरीजचे साम्राज्य विकसित केले. कंपन्यांचे बॅलेन्स शिट तपासण्यात वाकबगार असलेले विठ्ठल, तोट्यात चाललेले उद्योग विकत घ्यायचे आणि ते आपल्या उद्योगात सामाऊन घेऊन आपल्या व्यवस्थापन कौशल्यातून ते फायद्यात आणायचे. आपले संपूर्ण आयुष्य ते अत्यंत साधेपणाने राहीले. आपल्या एकेक पैशाचा हिशेब ते अत्यंत सचोटीने ठेवायचे. 1983 मध्ये त्यांच्या अकाली मृत्युनंतर हे साम्राज्य विजय माल्या यांच्या पदरात पडले. त्याची त्यांनी कशी वाट लावली याचा वृत्तान्त या पुस्तकात आहे.  सुरुवातीला बाप से बेटा सवाई या न्यायाने विजय मल्ल्या यांनी कंपनीची भरपूर प्रगती केली, परंतु कालांतराने या यशाची नशा त्यांच्या डोक्यात शिरली. त्यांनी त्यांच्या भोवती खुशमस्कारांची प्रभावळ निर्माण केली. साहेबांची थुंकी झेलायची एवढेच त्यांचे काम होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयावर विजय माल्ल्या यांची दिशाभूल केली. जे त्यांना योग्य मार्गदर्शन करत होते त्यांचे ते ऐकेनासे झाले. त्यांचे वर्तन आपल्या वडिलांच्या बिल...

India Clears Ethanol E100 Fuel Regulations

Image
 

ऋषी कपूर - खुल्लम खुल्ला ★★★★

Image
'खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेन्सॉर्ड' हे पुस्तक हातात घेताना मला वाटलं होतं की हे एखादं गुळगुळीत आणि सभ्य बॉलिवूड आत्मचरित्र असेल—ज्यातून गॉसिप आणि वादग्रस्त गोष्टींना शिताफीने बगल दिली असेल. पण प्रत्यक्षात, मला असं वाटलं जणू मी थेट चिंटूच्या (ऋषी कपूर) शेजारी, हातात व्हिस्कीचा ग्लास घेऊन एका धुरकट 'ग्रीन रूम'मध्ये बसलो आहे आणि तो त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वादाचा आणि प्रत्येक हृदयभंगाचा पाढा माझ्यासमोर वाचत आहे. हा अनुभव अतिशय जवळचा, अंगावर काटा आणणारा आणि प्रसंगी अगदी खळबळजनक होता. ही एखाद्या चित्रपट ताऱ्यासोबत चहा पिताना मारलेली गप्पांची साधी मैफल नाही; तर भरधाव वेगाने जगलेल्या एका आयुष्याचा हा 'बॅकस्टेज पास' आहे. राज कपूर यांचा मुलगा, रणबीर कपूरचा बाप आणि बॉलिवूडचा कायमस्वरूपी 'लव्हर बॉय' असलेला ऋषी कपूर—फक्त आपल्या घराण्याच्या वलयावर सहज विसंबून राहू शकला असता. पण 'खुल्लम खुल्ला'च्या आकर्षणाचे मुख्य कारण हेच आहे की, त्याने तसं करायला स्पष्ट नकार दिला. 'मेरा नाम जोकर' मधील त्याच्या नवख्या पदार्पणापासून ते 'ब...

अमिश त्रिपाठी - द चोला टायगर्स: अ‍ॅव्हेंजर्स ऑफ सोमनाथ ★★★★

Image
भारतीय साहित्याच्या विश्वात इतिहास आणि पौराणिक कथांचे अतिशय वेगाने आणि चित्रपटमय शैलीत सादरीकरण करण्यासाठी प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी ओळखले जातात. 'शिवा ट्रायलॉजी'पासून ते 'लेजेंड ऑफ सुहेलदेव'पर्यंत त्यांनी आपल्या विशिष्ट लेखनशैलीने वाचकांना नेहमीच खिळवून ठेवले आहे. 'द चोला टायगर्स: अ‍ॅव्हेंजर्स ऑफ सोमनाथ' या त्यांच्या नवीन पुस्तकाने या ऐतिहासिक रोमांचक साहित्याच्या परंपरेत एक अत्यंत मानाचा अध्याय जोडला आहे. हे पुस्तक वाचकाला थेट इसवी सन १०२५ च्या कालखंडात घेऊन जाते. ही तीच वेळ आहे, जेव्हा क्रूर आक्रमक महमूद गझनी याने गुजरातच्या पवित्र आणि वैभवशाली सोमनाथ मंदिरावर भीषण हल्ला करून अतोनात विध्वंस केला होता. सोमनाथ मंदिरातील पवित्र शिवलिंगाची झालेली विटंबना, निष्पाप प्रजेचा झालेला संहार आणि मंदिराची झालेली प्रचंड लूट या राखेतून उफाळून आलेली सूडाची आणि न्यायाची प्रबळ भावना, हा या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे. एका उद्ध्वस्त झालेल्या राष्ट्राला पुन्हा उभे करण्यासाठी आणि शत्रूला धडा शिकवण्यासाठी रचलेला हा एक अभूतपूर्व कट आहे. कथेचे मुख्य केंद्र आहेत इतिहासातील महान सम्राट...

ते मर्‍हाटी बोलैन

आतां सुमन देतु अवधान l धुमकुसें साहित्याचेन l जग भोजें नाचवीन l आनंदाचा l आधीचि जगा चंदन आवडे l वरि देवाचें अनुलेपन जोडे l तरि कवणां वालभ न पडे l तया सुखाचें ? l तैसें आएकतां श्रीकृष्णचरित्र l होय सकळ सुखाचें छेत्र l वरि जोडे ब्रम्हसुख पवित्र l ते मर्‍हाटी बोलैन l जिथे भाषेचिये रसवृत्ती l सा भाषांचे कुपे कीजेति निगुती l ते मर्‍हाटी कवण जाणे निरुती l जे रसांचे जीवन l ते मर्‍हाटी बोल रसिक l वरी दावीन देशियेचे बिक l म्हणैन सव्याख्यान श्लोक l मिसें वोवियेचेनि l — नरेंद्र धुमकुसें = गर्दीने, वालभ = आवड, निगुती = नीट, निरुती = योग्य, बिक = महत्व

पांडुरंग खानखोजे एक अवलिया

Image
क्रांतीवीर आणि कृषीमहर्षी: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि जागतिक कृषी क्षेत्रात आपल्या असामान्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे. एका हातात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बंदूक आणि दुसऱ्या हातात मानवतेच्या कल्याणासाठी धान्याचे कणीस घेणारा असा हा धगधगता महामानव होता. सशस्त्र क्रांती ते जागतिक स्तरावरील कृषी संशोधन असा त्यांचा थक्क करणारा प्रवास भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. बालपण आणि क्रांतीचे संस्कार डॉ. पांडुरंग खानखोजे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पालमपेठ येथे झाला. त्यांच्या कुटुंबात आधीपासूनच देशभक्तीचे वातावरण होते. त्यांच्या आजोबांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा थरार प्रत्यक्ष अनुभवला होता. आजोबांकडून ऐकलेल्या शौर्यकथांमुळे पांडुरंगरावांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीचे आणि क्रांतीचे बीज रोवले गेले. पुढील शिक्षणासाठी ते नागपूरला आले, जिथे त्यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या जहाल राष्ट्रवादी विचारांचा प्रचंड प्रभाव पडला. शालेय जीवनातच त्यांनी 'बाल समाज...