Posts

विज्ञान साहित्य आणि विज्ञान ललितबंध

Image
मानवी संस्कृतीच्या आणि विचारधारेच्या विकासात विज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राष्ट्र उभारणीत तंत्रज्ञान जितके गरजेचे आहे, तितकीच एक विवेकी आणि अंधश्रद्धामुक्त समाज घडवण्यात ‘विज्ञान साहित्य’ महत्त्वाची भूमिका बजावत असते. सर्वसामान्यांसाठी विज्ञान म्हणजे अनेकदा क्लिष्ट, अवघड आणि आकलनापलीकडचे क्षेत्र वाटू शकते. परंतु, विज्ञान साहित्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लेखकाच्या सर्जनशील कल्पनेचा सुंदर आविष्कार असतो. हा आविष्कार विज्ञान कथा, विज्ञान कादंबरी किंवा विज्ञान ललितबंधांच्या माध्यमातून व्यक्त होतो. यात अनेक सैद्धांतिक आधार असतात, त्यामुळे विज्ञान लेखकाची जबाबदारी अत्यंत मोठी असते. सर्वसामान्य वाचकांपर्यंत विज्ञानातील गुंतागुंत आणि त्यामागची सैद्धांतिक बाजू सोप्या भाषेत पोहोचवणे महत्त्वाचे ठरते. या अनुषंगाने अनेक लेखकांनी मराठी विज्ञान साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. ज्येष्ठ विज्ञान समीक्षक प्रा. रमेश देवधर म्हणतात, ‘भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध आणि त्या प्रगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, विज्ञान साहित्यातून अत्यंत प्रभावीपणे मांडला जातो.’ या साहित्याचे अनेक प्रकार पडतात. जस...

पाउलो कोएल्हो - द अलकेमीस्ट ★★★★

Image
गेल्या कित्येक वर्षांपासून पुस्तकांच्या दुनियेत आणि साहित्य वर्तुळात 'अलकेमीस्ट' (The Alchemist) या नावाची जोरदार चर्चा मी ऐकत आलो आहे. तुम्ही कोणत्याही बुकस्टोअरमध्ये जा किंवा ॲमेझॉनसारख्या ऑनलाईन शॉपिंग साइटवर फेरफटका मारा, 'बेस्टसेलर' या शीर्षकाखाली हे पुस्तक नेहमीच झळकताना दिसते. त्याचे मुखपृष्ठ आणि त्यावरील अफाट खपाचे आकडे पाहून साहजिकच कोणालाही उत्सुकता वाटावी, तशीच ती मलाही वाटली होती. पण गमतीचा भाग असा की, या पुस्तकाच्या नावावरून माझा सुरुवातीला एक मोठा गैरसमज झाला होता. शालेय जीवनात विज्ञानाचा अभ्यास करताना आम्ही 'किमयागार' किंवा 'अलकेमीस्ट' यांच्याबद्दल वाचले होते. हे असे प्राचीन संशोधक होते, जे सामान्य धातूंचे, विशेषतः लोखंडाचे सोने बनवण्याच्या प्रयत्नात आयुष्य खर्ची घालत असत. 'परीस' या काल्पनिक दगडाचा शोध हे त्यांचे ध्येय असे. त्यामुळे मला वाटले की, हे पुस्तक कदाचित त्या प्राचीन विज्ञानावर किंवा त्या संशोधकांच्या चरित्रावर आधारित एखादे माहितीपर पुस्तक असावे. याच कुतूहलापोटी आणि काही अंशी सामाजिक दबावापोटी (कारण 'हे पुस्तक वाचलेच प...

वि. स. वाळिंबे - नेताजी ★★★★★

Image
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अनेक पर्व होऊन गेली, पण ज्या पर्वाने ब्रिटीश साम्राज्याचा पाया खरोखरच हादरवून सोडला, ते पर्व म्हणजे 'नेताजी सुभाषचंद्र बोस' आणि त्यांची 'आझाद हिंद फौज'. हे रोमहर्षक पर्व मराठी वाचकांसमोर जिवंत करण्याचे शिवधनुष्य ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक वि. स. वाळिंबे यांनी आपल्या 'नेताजी' या पुस्तकातून समर्थपणे पेलले आहे. वि. स. वाळिंबे यांची लेखनशैली ही केवळ माहिती देणारी नसून ती वाचकाला त्या काळात घेऊन जाणारी आहे. 'व्होल्गा जेथे गंगेला मिळते' असो किंवा 'सतराशे सत्तावन', वाळिंबे इतिहास रंजकरीत्या पण सत्यतेचा आधार न सोडता मांडतात. 'नेताजी' हे पुस्तकही त्याला अपवाद नाही. हे केवळ सुभाषबाबूंचे चरित्र नाही, तर एका अशा महानायकाची गाथा आहे ज्याने "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" हे चाणक्यनीतीचे तत्त्व वापरून जागतिक राजकारणाच्या पटावर भारताच्या स्वातंत्र्याचा डाव मांडला. पुस्तकाची सुरुवातच अत्यंत वेगवान आणि नाट्यमय आहे. वाळिंब्यांची भाषा ओघवती आणि प्रवाही आहे. अनेकदा हे पुस्तक वाचताना आपण एखादी 'थ्रिलर...

वॅसीली मित्रोखीन, ख्रिस्तोफर अँड्रू - द मित्रोखीन अर्काइव २ ★★★★

Image
वॅसिली मित्रोखिन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केजीबीच्या पहिल्या मुख्य संचालनालयाच्या परदेशी हेरगिरी करणाऱ्या विभागामधून केली. जेव्हा मित्रोखिन यांनी निकिता ख्रुश्चेव्हच्या एका गुप्त भाषणावर टीका केली तेव्हा त्यांना ऑपरेशन्समधून अभिलेखागारात (डॉक्युमेंट अर्काइवज विभागात) स्थानांतरित करण्यात आले. १९६० च्या अखेरीस, केजीबीचे लुब्यांका हे मुख्यालय अपुरे पडू लागल्याने मॉस्कोबाहेर यासेनेव्हो येथे एक नवीन इमारत बांधली. या इमारतीला मुख्य संचालनालयाचा दर्जा देण्यात आला आणि तेथून सर्व परदेशी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात येऊ लागले. त्या वेळी अभिलेखागार विभागाचे प्रमुख असलेले मित्रोखिन यांना कागदपत्रांची यादी तयार करण्याचे आणि नवीन मुख्यालयात त्यांचे सुव्यवस्थित हस्तांतरण पाहण्याचे काम सोपवण्यात आले. भव्य अभिलेखागाराचे हस्तांतरण पूर्ण व्हायला १९७२ ते १९८४ अशी १२ वर्षे लागली. या गदारोळाचा फायदा घेऊन मित्रोखिन यांनी त्यातली काही कागदपत्रे आणि त्यांतील मजकूर चोरला. १९९० मध्ये सोविएत संघाचे विघटन झाले. त्याचा फायदा घेऊन तो लाटव्हियाला गेला आणि त्याने तेथील ब्रिटिश आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांशी ...

मार्क टुली - इंडिया इन स्लो मोशन ★★★

Image
मार्क टुली यांचा जन्म ब्रिटीश कालीन भारतात झाला. त्याकाळी त्यांना भारतीय समाजापासून कटाक्षाने दूर ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यामुळे ते काहीसे अर्धवट भारतीय आहेत. त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोण गोऱ्या ब्रिटिशांप्रमाणे पूर्वग्रहदूषित आहे. ज्याप्रमाणे गोऱ्यांना भारतीय समाजाच्या भावना समजत नाही, तसेच मार्क यांचेही झाले आहे. त्यांच्या लिखाणातून हे जाणवते. काही प्रमाणात त्यांची भारतातील लोकांच्या अध्यात्माविषयी, भ्रस्टाचाराविषयी मत योग्य असले तरी बऱ्याच गोष्टींची जाण आपण पूर्णपणे भारतीय असल्याशिवाय होत नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या पुस्तकातील काही टीका काही विचार एक भारतीय म्हणून आपल्याला पटत नाहीत. तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्‍या बालकामगारांच्या प्रश्‍नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेल...

कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

Image
कॉम्रेड पानसरे हे एक लेखकसुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते. "शिवाजी कोण होता?" हे त्यांच्या अनेक लेखनांपैकी सर्वांत प्रसिद्ध लेखन आहे. अथक परिश्रमाअंती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व १.५ लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले "शिवाजी कोण होता?" हे पुस्तक आपल्याला शिवाजींचे खरे दर्शन घडवते. आपल्या लेखनात पानसरे यांनी शिवाजी आपल्या काळातल्या इतर राजांत आगळा वेगळा कसा होता हे दाखवले आहे. लोकशाहीत जिथे कोणत्याही राजाचे अस्तित्व नाकारले जाते, तिथे शिवाजी राजाचे नाव मात्र आदराने घेतले जाते, त्याची जयंती साजरी केली जाते. याचीच कारण मीमांसा या पुस्तकात लेखकाने केली आहे. ज्या काळात जुलूमी राजेशाही भारतात बोकाळली होती, तिथे या रयतेच्या राजाने जन्म घेतला व जन कल्याणासाठी आणि स्वराज्याच्या स्थापने...

Short Books Recommendations

Image
Bibliophiles have always been a boastful bunch. They go on endlessly about how many books they have, how many hardcovers, and also, all of their custom bookmarks! So, if you have a similar person in your group, ask them to finish these books in a day. ‘Animal Farm’ by George Orwell A relatively small book of about 100-120 pages, ‘Animal Farm’ paints a dystopian world where animals overthrow their oppressive farmers and take over the farm. But soon, they too become corrupt like the humans they defeated. ‘Convenience Store Woman’ by Sayaka Murata Another short novel that can be completed in a single sitting is this one. The book is the story of Keiko Furukura, a woman who finds peace and calm in her convenience store job and has no will or expectations to climb the ‘social ladder’. 'Poonachi' by Perumal Murugan 'Poonachi' is a powerful novel by the acclaimed Perumal Murugan and is the story of a frail black goat in rural India. The book uses anthropomorphism and gives the...