Book Review : कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiSZDq7G9opBHntQU1GJcsKxWcGJjD9qyTM0QMpjgpJDPAvWCSzB2TtQOJ_rt8RyUK3_SEjmHsRs1XFnmHDttqJYZylqaks2Wq-B84_-BZUi3oSfhmws7HK7BRZNtPbyXUXoPiSo6Pb6IizPQ5yW1JCzu925EX5qW95HoP7-3pMcZCeQkLku8GESQ9e6Es/s320/Govind%20Pansare%20-%20Shivaji%20Kon%20Hota.jpg)
कॉम्रेड पानसरे हे एक लेखकसुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते. "शिवाजी कोण होता?" हे त्यांच्या अनेक लेखनांपैकी सर्वांत प्रसिद्ध लेखन आहे. अथक परिश्रमाअंती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व १.५ लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले "शिवाजी कोण होता?" हे पुस्तक आपल्याला शिवाजींचे खरे दर्शन घडवते. आपल्या लेखनात पानसरे यांनी शिवाजी आपल्या काळातल्या इतर राजांत आगळा वेगळा कसा होता हे दाखवले आहे. लोकशाहीत जिथे कोणत्याही राजाचे अस्तित्व नाकारले जाते, तिथे शिवाजी राजाचे नाव मात्र आदराने घेतले जाते, त्याची जयंती साजरी केली जाते. याचीच कारण मीमांसा या पुस्तकात लेखकाने केली आहे. ज्या काळात जुलूमी राजेशाही भारतात बोकाळली होती, तिथे या रयतेच्या राजाने जन्म घेतला व जन कल्याणासाठी आणि स्वराज्याच्या स्थापने...