Posts

Showing posts from 2006

पानिपत - विश्वास पाटील (दर्जा *****)

Image
विश्वासरावांचे गाजलेले पुस्तक पानिपत जेव्हा हातात आले, तेव्हा त्याबद्दल बरीच उत्सुकता लागून राहिली होती. लहानपणापासून मी पानिपतच्या तीन लढायांबाबत ऐकत आलो. शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातल्या सनावळ्या पाठ करताना मला बराच कंटाळा यायचा. वाटायचे की या घटनांच्या सनावळ्या पाठ करुन काय साधणार आहे. प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा काही उपयोग आहे का?, असा सवाल मी करायचो. परंतु करणार काय, म्हणतात ना, आलीया भोगासी असावे सादर. कीतीही कंटाळवाणा असला, तरी मी काय थोडाच अभ्यासक्रम बदलू शकणार होतो. मला आता नक्की आठवत नाही पण आठवी ते दहावी इयत्तेत असताना कधीतरी मराठीच्या पुस्तकात “भाऊसाहेबांची बखर” या कादंबरीवर आधारीत, “आपेश मरणाहून ओखोटे” हा अगदी पहिलाच धडा होता. त्याची भाषा प्राचीन मराठी भाषेवर आधारीत होती, त्यामुळे समजायला अतिशय कठीण होती. पहिलाच धडा असा कठीण पाहून मी हादरलोच. त्या धड्यातील एकही शब्द मला समजत नव्हता. पण त्यानंतर आमच्या शाळेतील मराठी विषयाच्या शिक्षिकेने तो धडा जेव्हा अतिशय सोप्या भाषेत समजावून दिला, तेव्हा कुठे हायसे वाटले. त्यानंतर भितीची जागा उत्सुकतेने घेतली. पानिपतच्या लढाईबद्दल प

Opinion : The ICICI BANK Trouble

Image
The ICICI BANK, one of the largest bank in India with a still largest network of ATM centers. When this bank first entered in common consumer market I was amazed by quality of their service. The ATM service introduced by them was really a boon for consumers like us to get money anytime 24/7/365. This was new for us who were used to go to bank during working hours (taking a half day leave for the purpose), and then stand in long queues to submit withdrawal slips and to find that cashier have closed the counter for a lunch time, toilet break or just because he wants to take a nap. This all changed when ATM network is built up by banks which we never dreamed before though we knew such thing exists in western countries, I thought it will not be possible in India this fast, putting cash on road without getting looted. ICICI proved it a reality by successfully operating it throughout the country. Ever since the ICICI consumer base is gradually increasing and they are finding it difficult t

Deception Point by Dan Brown (दर्जा : ****)

Image
“When a NASA satellite discovers an astonishingly rare object buried deep in the Arctic ice, the floundering space agency proclaims a much-needed victory. A victory with profound implications for NASA policy and the impending presidential election. To verify the authenticity of the find, the white house calls upon the skills of intelligence analyst Rachel Sexton. Accompanied by a team of experts, including the charismatic scholar Michael Tolland. Rachel travels to the Arctic and uncovers the unthinkable : evidence of scientific trickery. A bold deception that threatens to plunge the world into controversy. But before she can warn the President, Rachel and Michael are ambushed by a deadly team of assassins. Fleeing for their lives across a desolate and lethal landscape, their only hope for survival is to discover who is behind this masterful plot. The truth, they will learn, is the most shocking deception of all.” मी सहसा इंग्रजी पुस्तके वाचत नाही. मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असल्य

मी वाय. सी. - यादवराव पवार (दर्जा *****)

Image
“मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील बेताज बादशहा वरदाभाई उर्फ वरदराजन मुदलियार याचे साम्राज्य उध्वस्त करणा़ऱ्या वाय. सी. पवार नावाच्या पोलीस खात्यातील झंझावाताची ही आत्मकथा. संकल्प पक्का असेल आणि ध्येय निश्चित असेल तर साध्या कुटुंबात जन्म घेतलेला एक पोलीस अधिकारी गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि दंगली यांच्यावरही अंकुश ठेवू शकतो. चांगुलपणाचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि कठोरतेचे जिवंत प्रतिक असलेल्या या सच्चा पोलीस अधिकऱ्याचे वादळी आत्मचरित्र एकूणच खचलेल्या समाजजीवनाच्या अंध:कारात आशेचा किरण ठरेल.” माझा जन्म मुंबईत झाला. १९७२ पासून ते १९९६ पर्यंतचा काळ मी मुंबईत काढला. मुंबईत असताना या महानगराचे फायदे जसे झाले तसेच त्याच्या समस्यांचीही जाण झाली. भारतभरहून येणाऱया नशिब आजमावणाऱ्यांचे लोंढे आणि त्यांना आश्रय देणाऱ्या येथील झोपडपट्ट्या. ह्या झोपडपट्ट्या म्हणजे गुन्हेगारांचे आगार झाले होते. पोलीसही त्यांना हप्त्यासाठी साथ द्यायचे. अशावेळी वाय. सी. पवार या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याचे आगमन झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत मुंबईतल्या गुन्हेगारीचा पुरता बिमोड केला. तो मी स्वत: अनुभवला होता. त्यामुळे

10 things I hate about India

Image
I liked this article published on Rediff.com website. The author have pointed out exact points where India need to improve. Please remember that this author is a foreigner and written this article with his point of view. Original Author - Claude Arpi Many years ago a friend of mine wrote a book, The Wonder that IS India. Both of us have lived more for than 30 years in the Land of the Bharatiyas and share a love for this nation. When he showed me the manuscript of his book, I had pointed out that his representation of India was too rosy and suggested one more chapter -- 'The Horror that is India'. I think he did. I have the same feelings for India today: 95 per cent is good, but there are some aspects that I am still not able to swallow, even after all these years. I have listed ten of them. Even if it does not change anything, at least some of my frustrations will be released while penning them down. Before I begin, I must first say that during a recent visit to France, it was

मराठीतील निवडक विज्ञानकथा संपादन : निरंजन घाटे दर्जा (****)

Image
“विज्ञानकथा हा प्रकार मराठीमध्ये तसा नवा नाही. इ.स.१९०० पासून मराठीत विज्ञानकथा लिहिली जात आहे. तेव्हापासूनच्या गेल्या शंभर वर्षातील प्रातिनिधिक विज्ञानकथा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. या निमित्ताने एकत्र केलेल्या ह्या विज्ञानकथा वाचताना विज्ञानकथेचे स्वरुप कसे बदलत गेले तेही आपल्या लक्षात येते. मराठी विज्ञानकथेच्या गेल्या शंभर वर्षाच्या वाटचालीत अनेक मोठमोठ्या लेखकांचा हातभार लागला आहे. मराठी विज्ञानकथेच्या अभ्यासाच्या दृष्टीने ह्या संग्रहातील कथा जशा उपयोगी आहेत त्याच बरोबर एकविसाव्या शतकात जाताना मराठी विज्ञानकथेचे साहाय्यही वाचकाला होईल यात शंकाच नाही.” विज्ञानकथा हा पुर्वीपासून माझा आवडीचा विषय आहे. विज्ञानाधिष्ठीत दृष्टीकोन असल्याकारणानेही त्यातली तांत्रीक क्लीष्टता मला त्रास देत नाही. या कथा वाचण्यापूर्वी विज्ञानातील काही पायभूत नियम आणि माणसाची वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळातील अपेक्षा वाचकाला माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या कथा पुर्णपणे काल्पनिक असुन अतिशयोक्तीपुर्ण आहेत असा समज होण्याची शक्यता आहे. विज्ञान कथा म्हणजे सध्याच्या प्रचलीत विज्ञानाच्या

जगाची मुशाफिरी - निरंजन घाटे दर्जा (****)

Image
आज मी जगाची मुशाफिरी हे निरंजन घाटे यांनी लिहीलेले पुस्तक वाचून संपवीले. निरंजन घाटे हे एक उत्कृष्ट विज्ञानकथा लेखक असून काही वेळा इतर किरकोळ लेखनही करतात. त्यांची लेखनशैली सुबोध असून ओघवती आहे, त्यामुळेच ते माझे आवडते लेखक आहेत. हे पुस्तक प्रवासवर्णन असल्याप्रमाणे वाटते परंतू लेखकाने कुठेही प्रत्यक्ष प्रवास केल्याचे म्हटलेले नाही. त्यात जागाच्या कानाकोपऱ्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थळांचे यापुस्तकात वर्णन असल्यामुळे त्यासर्व जागी प्रवास करणे लेखकाला अशक्य असल्याचे वाटते. पुस्तकात एकूण ८८ पृष्ठे होती. ५ सप्टेंबर २००५ ला हे पुस्तक मी वाचावयास सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर २००५ ला संपविले. नुकतेच सभासदत्व पत्करलेल्या सदाशिव पेठेतल्या मराठी साहित्य परीषदेच्या ग्रंथालयातून हे पुस्तक मी मिळवले होते. हे पुस्तक आणि आणखिन एक पुस्तक अनिल काळे यांनी अनुवादीत केलेले ट्रीनिटिज चाईल्ड मी साहित्य परीषदेतून सभासद झाल्यानंतर प्रथमच घेतले. वेळ न पुरल्यामुळे ट्रीनिटिज चाईल्ड हे पुस्तक पुर्ण वाचू शकलो नाही. पुस्तकाचे लेखक निरंजन घाटे हे एक भूगोलतज्ञ असून पुण्यातच रहातात. विज्ञानविषयक दृष्टीकोन आणि ज्ञान या

वी दी नेशन (वाया गेलेली वर्षे) – वि. स. वाळींबे (मु. ले. नानी पालखीवाला) दर्जा (****)

Image
नानी पालखीवाला हे विसाव्या शतकातले भारतातले एक लोकप्रिय व्यक्तीमत्व होते. पेशाने वकील असलेले ही व्यक्ती, भारतीय कायदा आणि घटना यांमध्ये तज्ञ समजली जाते. वकीली व्यतिरीक्त विविध महाविद्यालयांतून त्यांनी अध्यापनाचे कामही केले. टाटा समुहासह काही नामांकीत कंपन्यांचे उच्च पदस्थ अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. काही काळ ते अमेरीकेतील भारताचे राजदूतही होते. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. भारतीय कायदा आणि घटना यांचा त्यांना नितांत आदर होता आणि भ्रष्टाचाराविषयी विलक्षण चीड होती. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना भारतीय लोकशाही आणखी मजबूत व्हावी, समाजातल्या सर्व थरातील लोकांनी आपले परस्पर भेदभाव विसरून, एक भारतीय म्हणून गुण्यागोविंदाने एकत्र राहावे अशी त्यांची इच्छा होती.      वी दी नेशन हे पुस्तक म्हणजे त्यानी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलेल्या विविध भाषणांचे आणि व्याख्यानांचे संकलन आहे. या सर्व भाषणातून त्यांनी भारतीय कायदा, घटना, अर्थव्यवस्था, लोकशाही, समाजवाद यांवर योग्य टिकाटीप्पणी केली आहे. काही ठीकाणी त्यांचे म्हणणे अतिशयोक्तिपुर्ण वाटते पण पुर्णपणे नाकारताही येत नाही.