Posts

Showing posts from 2025

माझ्या ब्लॉगचे स्थलांतर

Image
२००५ पासून मी ब्लॉगिंग करत आहे. फावल्या वेळेत "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" या उक्तीप्रमाणे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा थोडेफार लिहीण्याचा मी प्रयत्न करतो. वेगवेगळे विषय हाताळण्याचा मी प्रयत्न करतो. गूगलने उपलब्ध करून दिलेला ब्लॉगर हा प्लॅटफॉर्म या कामासाठी खूप उपयोगी पडला. विनामुल्य लेखन करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त होती. २००५ च्या आसपास ब्लॉगींगची चलती होती. अनेक प्रतिभावंत लेखक ब्लॉग लिहीत होते. २०१५ नंतर हळूहळू टिकटोक नावाचे शॉर्ट विडियोचे माध्यम प्रसिद्ध झाले. त्याने जगाला अक्षरश: वेड लावले. तोपर्यंत केवळ मित्रांना आपसात संवादाचे साधन असलेल्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम यांनीही त्यात उडी घेतली. त्याचबरोबर यूट्यूबवर व्हिडिओ ब्लॉग बनवणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. लेखन वाचण्यापेक्षा दृकश्राव्य माध्यम लोकांना जास्त पसंत पडले. या काळात बऱ्याच लेखकांनी ब्लॉग लिहिणे सोडून या दृकश्राव्य माध्यमांचा आसरा घेतला. एकेकाळी प्रचुर लेखन होत असलेले ब्लॉग ओस पडले. मी मात्र इतकी वर्षे इमानेइतबारे ब्लॉग लेखन करत आहे. ब्लॉग लेखनाची लाट ओसरल्यामुळे गुगलचेही या माध्यमाकडे दुर्लक्ष झाले आहे. बऱ्याच ...

Book Review : कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

Image
कॉम्रेड पानसरे हे एक लेखकसुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते. "शिवाजी कोण होता?" हे त्यांच्या अनेक लेखनांपैकी सर्वांत प्रसिद्ध लेखन आहे. अथक परिश्रमाअंती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व १.५ लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले "शिवाजी कोण होता?" हे पुस्तक आपल्याला शिवाजींचे खरे दर्शन घडवते. आपल्या लेखनात पानसरे यांनी शिवाजी आपल्या काळातल्या इतर राजांत आगळा वेगळा कसा होता हे दाखवले आहे. लोकशाहीत जिथे कोणत्याही राजाचे अस्तित्व नाकारले जाते, तिथे शिवाजी राजाचे नाव मात्र आदराने घेतले जाते, त्याची जयंती साजरी केली जाते. याचीच कारण मीमांसा या पुस्तकात लेखकाने केली आहे. ज्या काळात जुलूमी राजेशाही भारतात बोकाळली होती, तिथे या रयतेच्या राजाने जन्म घेतला व जन कल्याणासाठी आणि स्वराज्याच्या स्थापने...